News

आक्रमक भारतीय खेळामुळे भारताचा 2-0 ने विजय

By Mumbai Indians

भारतीयांच्या दणदणीत खेळाला पाऊसदेखील थांबवू शकला नाही. कानपूरमधल्या ग्रीन पार्क स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन दिवस पावसाने वाया गेल्यानंतरही भारताने बांग्लादेशला सात विकेट्सनी पराभूत केले. भारताने ही मालिका 2-0 ने खिशात टाकली आपल्याविरोधात कसोटी जिंकायला बांग्लादेशला अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल हे दाखवून दिले.

पहिल्या इनिंगमधला भारताचा बॅटिंग शो घरच्या खेळपट्टीवरचा पाया ठरला. रो आणि टीमने चाहत्यांना अप्रतिम फलंदाजीचे दर्शन घडवले संपूर्ण जगातल्या क्रिकेप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

या सामन्यात प्रत्येकाने टीमला स्वतः पेक्षा जास्त प्राधान्य दिले आणि त्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला. चला तर मग बघूया काय काय झालं ते...

बूम बूम आणि टीमची कामगिरी

जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजांनी सुंदर खेळ करत संपूर्ण बांग्लादेश टीमला 40 ओव्हरमध्ये फक्त 233 धावांवर बाद केले. चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला तेंव्हा त्यांना थांबवणारे कोणीच नव्हते. बूम बूम तर सकाळी धमाके करत होता. त्याच्या चेंडूवर खेळणे फलंदाजांना अशक्य वाटू लागले होते.

आकाशदीपने (2/43) पहिल्या दिवशी आपल्याला उत्तम सुरूवात करून दिली होती. रवींद्र जडेजाने त्यावर कळस चढवत कसोटीत 300 वी विकेट घेऊन इनिंगचा दणदणीत शेवट केला.

अनेक दशकांमधली देखणी फलंदाजी

वेळ गेल्यानंतरही विजय मिळवायचाच या दृढनिश्चयाने खेळायला उतरलेल्या कॅप्टन रो आणि टीमने अक्षरशः आतिषबाजी केली. पांढरा गणवेश घालून लाल चेंडूने टी 20 सामना खेळत असल्यासारखे वाटत होते.

रोहितने आपल्या पहिल्याच दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. त्याच्यासोबत टीमसुध्दा उतरली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालेली फलंदाजी आयुष्यभर लक्षात राहील अशी होती.

यशस्वी जैस्वाल (51 चेंडूमध्ये 72 धावा) आणि केएल राहुल (43 चेंडूमध्ये 68 धावा) करून अर्धशतके झळकावली. भारताने एकेक विक्रम नव्याने नोंदवला. सर्वात वेगवान टीमच्या 50, 100, 150, 200 आणि 250 धावा करून भारतीय संघ फक्त 34.4 ओवर्समध्ये 285/9 धावांवर गेला. भारताकडे आधीच 52 धावांची आघाडी होती. त्यामुळे आपल्याला बांग्लादेशला मागे ढकलणे शक्य झाले.

पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळला

पहिल्या इनिंगमध्ये भारताने अविश्वसनीय फटकेबाजी केल्यामुळे धक्का बसलेल्या बांग्लादेशच्या टीमला फक्त 36/3 धावाच करता आल्या. रवीचंद्रन अश्विनने नवीन बॉलचा (3/50) पूर्ण वापर केला. पाहुण्या संघाने थोडी धडपड केली पण सर जडेजा आल्यावर (3/34) त्यांचे काहीच चालले नाही.

या डावखुऱ्या स्पिनरने खेळ सांडला. मग बुमराने बांग्लादेशला तो आणखी विस्कटून दिला. पाहुणा संघ फक्त 146 वर धाराशायी झाला.

लक्ष्य 95 धावांचे. फक्त एक औपचारिकता

भारतासमोर असलेले 95 धावांचे लक्ष्य फक्त एक औपचारिकता म्हणून खेळले गेले. आपण 98/3 धावा फक्त 17.2 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या. जैस्वालने पुन्हा एकदा सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि आपण पहिल्याच सत्रात खेळ संपवून घरी आलो.

कसोटी मालिका संपली. आता स्काय आणि इतर लोक टी 20 साठी तयार आहेत. चाहते तर प्रतीक्षेतच आहेत.

थोडक्यात धावसंख्या- भारत 285/9 (यशस्वी जैस्वाल 72, केएल राहुल 68, मेहिदी हसन मिरज 4/41, शकीब अल हसन 4/78) आणि 98/3 (यशस्वी जैस्वाल 51, विराट कोहली 29*, मेहीदी हसन मिरज 2/44) कडून बांग्लादेशचा सात विकेटनी पराभव 233 (मोमिनुल हक 107* जसप्रीत बुमरा 3/50, आकाश दीप 2/43) आणि 146 (शादमन इस्लाम 50, जसप्रीत बुमरा 3/17, रवींद्र जडेजा 3/34)