
ऋषभ पंत, हार्दिक पंड्यामुळे भारत आठ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय सामन्यात विजयी
ऋषभ पंतने एकदिवसीय सामन्यात पूर्ण केलेले शतक आणि हार्दिक पंड्याची अप्रतिम अष्टपैलू कामगिरी यांच्यामुळे भारताला मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ड येथे तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडवर पाच विकेट्सनी विजय मिळवता आला.
भारताने ११३ चेंडूंवर पंतच्या १२५ धावा आणि पंड्याच्या ५५ चेंडूंमध्ये ७१ धावांचे सोने करून इंग्लंडने उभारलेली २६० ची धावसंख्या फक्त ४२.१ ओव्हर्समध्ये गाठली.
तत्पूर्वी पंड्याची चार विकेट्सची कामगिरी आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहलच्या ३/६० मुळे भारताला इंग्लंडला ४५.५ ओव्हर्समध्ये २५९ धावांमध्ये बाद करता आले.
पाहुण्या संघाला दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराऐवजी जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजला खेळायला आणावे लागले तर इंग्लंडने आपल्या आधीच्या सामन्यातील संघ खेळवायचा निर्णय घेतला.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडची सुरूवात धक्कादायक झाली. सिराजने सलामी फलंदाज जॉनी बेरस्टो (०) आणि जो रूट (०) यांना पॉवर प्लेच्या पहिल्या दोन ओव्हर्समध्ये बाद केले.
जेसन रॉय आणि बेन स्टोक्स यांनी त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडची बाजू सावरून धरली. परंतु पंड्याने पुन्हा एकदा आपल्या सुंदर अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन घडवत लागोपाठ रॉय (४१) आणि स्टोक्स (२७) यांच्या लागोपाठ विकेट्स घेतल्या.
यजमान संघ प्रचंड तणावाखाली असताना इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू मोईन अली आणि कर्णधार जोस बटलर यांनी मधल्या ओव्हर्समध्ये अत्यंत हुशारीने खेळ करून पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली.
दरम्यान रोहितचा रवींद्र जडेजाला गोलंदाजीसाठी आणण्याचा निर्णय फळाला आला. त्याने अलीला ३४ धावांवर बाद केले.
एकीकडे इंग्लंडच्या विकेट्स पडत असताना बटलरने दुसरीकडे बाजू सावरून धरली आणि त्याने आपले एकदिवसीय क्रिकेटमधील २२ वे अर्धशतक पूर्ण केले.
त्याचवेळी पंड्याने आपल्या अप्रतिम खेळाचे प्रदर्शन घडवत ३६ व्या ओव्हरमध्ये लियाम लिव्हिंगस्टन (२७) आणि बटलर (६०) ला बाद केले.
इंग्लंडचा संघ अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला. तत्पूर्वी क्रेग ओव्हरटन (३२) आणि डेव्हिड विली (१८) यांनी काही धावांची मौल्यवान भर घातली.
मालिका कोणाच्या हातात जाणार हे निश्चित करणाऱ्या या सामन्यात इनिंगच्या सुरूवातीलाच भारतीय संघ अडचणीत आला. त्यांनी आपले सलामी फलंदाज शिखर धवन (१) आणि कर्णधार रोहित शर्मा (१७) पहिल्या पाच ओव्हर्समध्येच गमावले.
भारतीय जादूगार विराट कोहली खेळपट्टीवर सरावण्यापूर्वीच १७ धावा करून बाद झाला. त्या वेळी पाहुणा संघ ८.१ ओव्हर्समध्ये ३८/३ वर धडपडत होता.
सूर्यकुमार यादव आणि पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ३४ धावा जोडल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू २८ चेंडूंवर १६ धावा करून बाद झाला.
भारतीय संघ ७२/४ वर कठीण परिस्थितीत असताना पंत आणि पंड्या यांनी आक्रमक क्रिकेट खेळडून भारताला पुन्हा सामन्यात आणले.
या दोघांनी अत्यंत तणावात असताना १३३ धावांची भागीदारी करून पाहुण्या संघाला सामना जिंकण्याच्या स्थितीत आणले.
त्यानंतर पंड्या ७१ धावांवर बाद झाला. परंतु पंतने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय खेळाच्या स्वरूपात आपली पहिली शतकी खेळी करताना खेळ सुरूच ठेवला.
एकही विकेट न गमावता पंत (१२५*) आणि जडेजा (७) यांनी भारताला २०१४ नंतर इंग्लंडमधली पहिली एकदिवसीय खेळाची मालिका जिंकून दिली.
पंतला या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय खेळातील उत्तम कामगिरीसाठी सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला तर पंड्याला तिन्ही सामन्यांतील उत्तम खेळाच्या प्रदर्शनासाठी मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
इंग्लंडविरूद्ध टी२०आय आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका जिंकल्यानंतर भारत आता २२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरूद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे.