
इंग्लंड विरूद्ध भारत दुसरा एकदिवसीय सामनाः इंग्लंडचा १०० धावांनी विजय. आता निकाल तिसऱ्या सामन्यात
इंग्लंडने लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारताविरूद्ध १०० धावांनी विजय मिळवला असून ही तीन सामन्यांची मालिका आता १-१ अशी बरोबरीत आणली आहे.
रीस टॉपलीच्या विक्रमी सहा विकेट्सच्या खेळामुळे (६/२४) यजमान संघाला भारताला ३८.५ ओव्हर्समध्ये १४६ धावांवर बाद करता आले. टॉपलीच्या धुंवाधार गोलंदाजीमुळे युजवेंद्र चहलची ४/४७ ही कामगिरी झाकोळली गेली.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या ११ च्या संघात विराट कोहली हा एकमेव बदल होता. तो श्रेयस अय्यरच्या जागेवर खेळायला आहे. त्याचवेळी इंग्लंडने ओव्हरमधील पहिल्या ओडीआयमध्ये खेळलेल्या ११ च्या संघाला कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
इंग्लंडने ४६-१ चा पॉवर प्ले स्कोअर ठेवला आणि जेसन रॉय २३ धावांवर बाद झाला. जॉनी बेरस्टॉने ३८ धावांची संख्या उभी करून इंग्लंडला ५० धावांपलीकडे नेले. तो बाद झाल्यावर यजमान संघातील जो रूट (११), बेन स्टोक्स (२१) आणि कर्णधार जोस बटलर (४) यांना फलंदाजीत चमकदार कामगिरी करता आली नाही.
मोईन अली आणि लियम लिव्हिंग्स्टन यांच्यामधील सहाव्या विकेटसाठीच्या ४६ धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला २९ ओव्हर्समध्ये १५० पर्यंत पोहोचता आले. लिव्हिंग्स्टन ३३ धावांवर बाद झाला. त्यामुळे यमजान संघाला ३९.४ ओव्हर्समध्ये २०० धावा पूर्ण करणे शक्य झाले.
मोईन अलीने डेव्हिड विलीसोबत ६२ धावांची भागीदारी केली. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले कारण तो ४२ व्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्याने ६७ चेंडूंमध्ये ४६ धावा काढल्या. त्यामुळे इंग्लंडला मोहम्मद शामी, जसप्रीत बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा या भारतीय जलदगती गोलंदाजांवर दबाव ठेवता आला.
विली ४७ व्या ओव्हरमध्ये बाद होण्यापूर्वी त्याने मोईनचा कित्ता गिरवत ४९ चेंडूंवर ४१ धावा केल्या. यजमान संघ ४९ ओव्हर्समध्ये २४६ धावा करून सर्वबाद झाला.
युजवेंद्र चहलने १० ओव्हर्समध्ये ४/४७ अशी कामगिरी केल्यामुळे तो भारताचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारतीय गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
भारताच्या २४७ धावांचा पाठलाग करण्याची सुरूवात थोडी अडखळथ झाली. भारतीय संघाने ११.२ ओव्हर्समध्ये ३१/४ अशी धावसंख्या केली. कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांना धावा करता आल्या नाहीत तर शिखर धवन आणि विराट कोहली अनुक्रमे फक्त ९ आणि १६ धावा करू शकले.
हार्दिक पंड्याने सूर्यकुमार यादवसोबत ४२ धावांची भागीदारी करून भारताच्या फलंदाजीत थोडा जीव ओतला. त्याशिवाय त्याने रवींद्र जडेजासोबत २८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मोईन अलीने त्याला २९ धावांवर बाद केले.
मोहम्मद शामी याने २८ चेंडूंवर २३ धावांची छोटी आणि चांगली खेळी केली. त्यात दोन चौकार आणि एक षटकार होते.
रीस टॉपलीने इंग्लंडच्या १०० धावांच्या विजयावर शिक्कामोर्तब करताना आपल्या खेळाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या विकेट्स घेतल्या.
टॉपलीच्या ६/२४ या कामगिरीमुळे इंग्लंडला सामना विजयी करणे शक्य झाले आणि त्याची ही आकडेवारी एक दिवसीय क्रिकेटमधली सर्वोत्तम आकडेवारी ठरली.
इंग्लंड आणि भारत आता तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत. अंतिम सामना ओल्ड ट्रॅफॉर्डवर रविवार दिनांक १७ जुलै रोजी खेळला जाईल.