
हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताचा इंग्लंडवर ५० धावांनी विजय- तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेत १-
भारतीय क्रिकेट संघाने पांढऱ्या चेंडूच्या मालिकेला अत्यंत धडाक्यात सुरूवात केली. त्यांनी साऊथॅम्प्टनमध्ये रोझ बाऊलवर आयोजित तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २०आय सामन्यात इंग्लंडचा ५० धावांनी पराभव केला.
भारताचा जादूई कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आपल्या स्टार ऑल राऊंडर हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू खेळीवर स्वार होऊन पाहुण्या संघाला या तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेत १-० ने आघाडी मिळवून दिली आहे.
एकूण १९९ धावांच्या आव्हानात्मक खेळीचा बचाव करताना पंड्याची चार विकेट्सची कामगिरी आणि युजवेंद्र चहलच्या दोन विकेट्समुळे भारताने १९.३ ओव्हर्समध्ये इंग्लंडला ऑल आऊट केले.
इंग्लंडचा नव्याने नेमलेला लिमिटेड ओव्हर्समधील कर्णधार जोस बटलरला या वेळी भारताच्या आघाडीचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने शून्यावर बाद केले. कुमारने धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या बटलरला पहिल्याच ओव्हरमध्ये इनस्विंगर टाकून चकवले आणि बाद केले.
त्यानंतर पंड्याने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत डेव्हिड मलन (२१), लियाम लिविंगस्टन (०) आणि जेसन रॉय (४) यांना बाद करून इंग्लंडला पहिल्याच सहा ओव्हर्समध्ये प्रचंड दबावाखाली आणले.
इंग्लंडचा संघ ३३/४ वर रखडत असताना हॅरी ब्रूक आणि मोई अली यांनी पाचव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. त्यानंतर लेग स्पिनर चहलने भारतीय संघाला विकेट मिळवून देत प्रथमच खेळणाऱ्या ब्रिटिश खेळाडूला २८ वर बाद केले.
चहलने अलीला ३६ धावांवर असताना बाद केले. त्याची कामगिरी चमकदार ठरली.
अष्टपैलू ख्रिस जॉर्डन १७ चेंडू आणि २६ धावांवर नाबाद राहिला. त्याच्याशिवाय उर्वरित इंग्रिश बॅट्समन तग धरू शकले नाहीत. ते १४८ धावांवरच सर्व बाद झाले.
त्यापूर्वी हार्दिक पंड्याने टी२०आय मधील पहिले अर्धशतक फटकावले. त्याशिवाय सूर्यकुमार यादव आणि दीपक हूडा यांच्या सुंदर खेळामुळे भारताला दिलेल्या २० ओव्हर्समध्ये एकूण १९८/८ अशी कामगिरी करणे शक्य झाले.
कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाहुण्या संघाने धुंवाधार फलंदाजी केली.
नुकत्याच कोविड-१९ मधून बरे झालेल्या रोहितने इंग्लंडचा ऑफ स्पिनर मोईन अलीकडून बाद होण्यापूर्वी १४ चेंडूंमध्ये २४ धावा काढल्या.
आयर्लंडमध्ये टी२०आयचे पहिले शतक फटकावल्यानंतर दीपक हूडा ईशान किशनसोबत खेळायला आला. त्याने पाचव्या ओव्हरमध्ये अलीच्या चेंडूवर दोन षटकार ठोकले आणि आपला फॉर्म उत्तम असल्याची पावती दिली.
परंतु, किशन १० चेंडूंवर फक्त ८ धावा काढून बाद झाल्यामुळे भारताला त्याचा फटका बसला.
त्यानंतर सूर्यकुमार यादव हूडासोबत आला. त्यांनी भारताचा आक्रमक खेळ सुरूच ठेवला. या दोघांनी भारतीय संघाला पॉवर प्लेच्या शेवटी ६६/२ वर आणून ठेवले. हा टी२०आय स्वरूपातील या मैदानावरचा पहिल्या सहा ओव्हर्समधील सर्वाधिक स्कोअर ठरला.
हूडा आणि यादव यांनी चेंडू वारंवार सीमापार टोलवत धावांचा भडिमार केला. त्यानंतर ब्रिटिश जलदगती गोलंदाज ख्रिस जॉर्डन याने बडोद्याच्या अष्टपैलू खेळाडूला फक्त १७ चेंडूंवर ३३ धावा काढून बाद केले. हूडाच्या खेळीमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
त्यानंतर यादवसोबत क्रीझवर आलेल्या हार्दिक पंड्याने आपण फॉर्ममध्ये असून प्रचंड आक्रमक खेळणार असल्याचे दाखवले. त्याने ब्रिटिश लेग स्पिनर मॅथ्यू पार्किन्सन्सच्या गोलंदाजीवर दोन देखणे चौकार फटकावून फक्त ९.४ ओव्हर्समध्ये भारताला शंभरावर आणून ठेवले.
पंड्या यांनी यादव यांनी ब्रिटिश बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. परंतु जॉर्डनने १९ चेंडूंमध्ये ३९ धावा काढल्यामुळे अत्यंत धोकादायक ठरलेल्या यादवची विकेट घेतली. ही सामन्यातील त्याची दुसरी विकेट होती.
फलंदाजीचा क्रम दीर्घकाळ ठेवण्यासाठी भारताने विकेट कीपर फलंदाज दिनेश कार्तिकऐवजी अष्टपैलू अक्झर पटेल याला पाठवायचे ठरवले.
अक्झर आणि हार्दिक यांनी पाच ओव्हर्समध्ये ४५ धावा रचल्या. त्यानंतर तो १२ चेंडूंवर १७ धावा काढून बाद झाला.
पंड्याने आपले टी२०आयमधील पहिले अर्धशतक काढले. पण त्याला डावखुरा जलदगती गोलंदाज रीस टॉपलीने बाद केले.
इंग्लंडने शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये पुनरागमनाची चिन्हे दाखवली. त्यांनी फक्त २० धावा दिल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कार्तिक (११) आणि हर्षद पटेल (३) यांना बाद केले. भारताची इनिंग १९८/८ वर संपली.
जॉर्डन आणि अली हे इंग्लंडसाठी दर्जेदार फलंदाज ठरले. त्यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
भारताच्या जवळपास २०० धावा संघाला विजय प्राप्त करून देतील असेच दिसत होते कारण इंग्लिश फलंदाज एवढे मोठे लक्ष्य पार करायच्या स्थितीत नसल्याचे दिसून आले.
भारत आणि इंग्लंडचा खेळ बर्मिंगहॅम येथील एजबस्टनमध्ये शनिवार ९ जुलै रोजी आयोजित दुसऱ्या टी२०आय सामन्यात पुन्हा सुरू होईल.