News

हार्दिकचा २०१६ मधला बचाव ते २०१८ मधला डीकेचा हल्ला- टी२०आयमध्ये INDvBAN च्या सर्वोत्तम आठवणी

By Mumbai Indians

कसोटी - जिंकलो!

टी२०आय- आला रे!

आपल्या लाडक्या सूर्यादादाच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्लू ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी२०आय मालिकेत बांग्ला टायगर्सचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत.

कसोटी मालिका ताब्यात आल्यानंतर विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन्स खेळाच्या सर्वांत लहान स्वरूपात आपले पंख पसरण्यासाठी तयार आहेत. आगामी टी२०आयच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही आशियाई स्पर्धकांमधील सर्वांत रोमांचक टी२०आय सामन्यांची ही झलक.

ग्रुप टप्पा, टी२० वर्ल्ड कप २०१४

२००७ च्या विश्व टी२० चॅम्पियन्सनी आयोजकांच्या तुलनेत सहजपणे आठ विकेट्सनी विजय मिळवला. त्याचे कारण मुंबईचा राजा रोहित शर्माने केलेली आणखी एक अप्रतिम खेळी हे होते.  

बांग्लादेशला २० ओव्हर्समध्ये फक्त १३८/७ धावा करता आल्या. रो (४४ चेंडूंमध्ये ५६ धावा) आणि विराट कोहली (५० चेंडूंमध्ये ५७ धावा) यांनी आपली अर्धशतके अगदी सहजपणे पूर्ण केली. त्यानंतर एमएस धोनीने एक सुंदर षटकार मारून खेळ पूर्ण केला. आपण या वेळी सलग तीन सामने जिंकलो.

**********

सुपर १०, टी २० विश्वचषक २०१६

पलटन, कुंग फू पांड्याच्या त्या अंतिम ओव्हरमध्ये जायला तयार आहात का?

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाला २० ओव्हर्समध्ये फक्त १४६/७ धावाच करता आल्या.

पण या स्पर्धेच्या शेवटच्या ओव्हरची आठवण करा. तत्कालीन कर्णधार एमएस धोनीने हार्दिक पांड्यावर शेवटच्या ओव्हरमध्ये १० धावांचा बचाव करण्याची जबाबदारी टाकली आणि आपल्या कर्णधाराने ती लीलया पेलली.

त्यानंतर या अष्टपैलू खेळाडूने पहिल्या तीन चेंडूमध्ये नऊ धावा दिल्या. त्यानंतर त्याने दोन चेंडूंमध्ये दोन विकेट्स घेतल्या आणि मग एक महत्त्वाचा डॉट चेंडू टाकून आपल्या संघाला एका धावेने विजय मिळवून देण्यासाठी मदत केली.

**********

अंतिम सामना, निदाहास ट्रॉफी २०१८

या दोन संघांमधील अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत भारताला आणखी एक ट्रॉफी मिळवणे शक्य झाले.

आपल्यासमोर १६७ धावांचे लक्ष्य होते. रो ने आपल्या ४२ चेंडूंमध्ये ५६ धावांच्या तोड फोड स्कोअरने सुरूवात केली आणि पाठलाग यशस्वी केला. १८ ओव्हर्स संपेपर्यंत टीम इंडियाला अद्याप ३४ धावांची गरज होती.

त्यानंतर आला दिनेश कार्तिक. त्याने अगदी शून्य मिनिटांत सेटल होऊन पेनल्टी टाइम ओव्हरमध्ये २२ धावा ठोकल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावांची संख्या १२ वर आणली. विजय शंकर उपांत्य चेंडूवर बाद झाला तेव्हा भारताला हा सामना जिंकण्यासाठी अजून पाच धावांची गरज होती.

या विकेट कीपर फलंदाजाने एक जोरदार षटकार मारून भारतीय संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. हा विजय क्रिकेट जगतात सर्वोत्तम टी२०आय सामन्यांपैकी एक ठरला आहे.

**********

ग्रुप टप्पा, टी२० विश्वचषक २०२२

आणखी एक जागतिक स्पर्धा, आणखी एक दणदणीत विजय!

सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने १८४/६ धावा फटकवायला काहीही कमतरता ठेवली नाही. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी केलेल्या अर्धशतकांबरोबरच स्कायने १६ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या.

बांग्लादेशने पाठलाग सकारात्मक पद्धतीने सुरू केला. त्यांनी सात ओव्हर्समध्ये ६६/० धावा केल्या. त्यानंतर पावसाने खेळात अडथळा आणला. त्यानंतर जे घडले तो क्लासिक इंडिया कमबॅक सामना ठरला.

बांग्लादेशसमोर १६ ओव्हर्समध्ये १५१ धावांचे सुधारित लक्ष्य होते. त्यांनी विजयाच्या मार्गावर सुरूवात केली पण आपल्या फलंदाजांच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती. अप्रतिम गोलंदाजी आणि त्यासोबत वेळेत विकेट्स पडल्यामुळे बांग्लादेशी संघ १४५/६ वर थांबला. आपण हा सामना ५ धावांच्या अत्यंत कमी अंतराने (डीएलएस पद्धत) जिंकला. हार्दिक पांड्याने शेवटच्या दोन विकेट्स घेऊन विजय आणखी गोड केला.

**********

सुपर ८, टी२० वर्ल्ड कप २०२४

भारताच्या आत्ताच्या टी२० विश्वचषक विजयाचा उल्लेख न करता विजयाची यादी अपूर्णच राहील.

टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या ग्रुप १ सामन्यात टीम इंडियाने गो या शब्दापासून सुरूवात केली. त्यांनी १९६/५ ची दणदणीत धावसंख्या नोंदवली. आपल्या हिटमॅनने ११ चेंडूंमध्ये २३ धावांची कामगिरी केली आणि त्यानंतर एचपीने १८५.१८ च्या स्ट्राइक रेटने ५० धावा केल्या.

बूम बूम कॅरेबियनमध्ये अक्षरशः वाऱ्यावर स्वार होता. त्याने देखण्या गोलंदाजीचे दर्शन घडवत ३.२५ च्या सरासरीने २/१३ विकेट्स घेतल्या आणि भारताला ५० धावांनी विजय मिळवून दिला. त्यामुळे भारतीय संघ विजयाच्या आणखी जवळ आला.